धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पिंपरी या गावात हजारोच्या संख्येने जनावरांचे डोके, पाय व इतर हाडांची साठवणूक करण्यात आली आहे. ही हाडे गोवंशाची असल्याची माहिती असून, धाराशिव ग्रामीण पोलिस निरीक्षक शेळके हे स्वतः घटनास्थळी आले आहेत. पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली आहे. मात्र महसूल व पशुसंवर्धन विभागाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे.
शहरात गोवंशाची कत्तल झाल्यानंतर त्यांचे डोके, पाय व इतर हाडे या ठिकाणी आणून वाळवली जात असून, यामुळे या भागात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. गोवंश बंदी केली असली तरी कत्तल होत असल्याचे अनेक कारवाईतून समोर आले आहे. पिंपरी येथील अवैध कारखाना उध्दवस्त करीत यापूर्वी कारवाई करण्यात आली होती. मात्र पुन्हा तिथे तोच प्रकार सुरू आहे. नागरिकांनी याबाबत अनेक वेळा तक्रार, निवेदने देवूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला. या ठिकाणी असलेली हाडे व इतर अवशेष कुठून आले हे पाहून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.