कळंब (प्रतिनिधी)- केंद्र शासनाच्या रेल्वे मंत्रालयाने उस्मानाबाद व्हाया बीड औरंगाबाद रेल्वे मार्गासाठी अर्थसंकल्पात आठ कोटीची तरतूद केली आहे यामुळे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुका ही रेल्वेच्या नकाशावर येणार आहे याबद्दल कळंब येथील नागरिकांनी आनंद व्यक्त करून शासनाचे आभार व्यक्त केले.  या प्रश्नासाठी रविवार दि 16 मार्च रोजी येथील पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान परिसरातील ज्येष्ठा साठीचा विरंगुळा येथे रेल्वे सर्वेक्षण आणि रेल्वे स्थानक संदर्भात डॉ रामकृष्ण लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत केंद्र शासनाच्या रेल्वे 

बैठकीत सर्वेक्षण करताना रेल्वे मार्ग कळंब जवळून निश्चित करावा, त्या मार्गावर कळंब रेल्वे स्थानक करावे, रेल्वे सर्वेक्षण संदर्भातील  शासकीय दस्तऐवज उपलब्ध करून त्याचा सखोल अभ्यास करणे, रेल्वे चे संबंधित अधिकारी, खासदार, आमदार, यांना भेटून आपल्या मागण्या लावुन धरणे, इ विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. बैठकीसाठी कळंब शहरातील सर्व स्तरातील व्यापारी, डॉक्टर ,वकील ,राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नागरिकांची उपस्थिती होती बैठकीमध्ये  डॉ. संजय कांबळे, सी.आर. घाडगे,  मुसादेक काझी, सतपाल बनसोडे, सुरेश टेकाळे, डॉ, महाकुंडे,यशवंत हौसलमल, सचिन गायकवाड, प्रा. मोहन जाधव, संजय घोगरे, किशोर वाघमारे, ऍड,एस.एम.जाधवर , कमलाकर पाटील,प्रभाकर ढवण, रमेश जगताप,ऍड,अजित गवळी,  यांनी आपले विचार व्यक्त केले बैठकीचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे यांनी या प्रश्नासाठी कार्यकारणी गठन करण्यासाठी तसेच पुढील दिशा ठरवण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगितले,प्रास्ताविक व सूत्रसंचलन माधवसिंग राजपूत यांनी केले तर आभार ऍड,मनोज चोंदे यांनी मानले.

 
Top