कळंब (प्रतिनिधी)- सध्याच्या काळामध्ये इंधन बचत करणे ही एक काळाची गरज आहे. इंधन बचत करून राष्ट्र विकासाला हातभार लावावा असे मत कळंब  आगार व्यवस्थापक एस. डी. खताळ यांनी व्यक्त केले.  येथील बस आगारात राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दि 16 जानेवारी ते 15 फेबु्रवारी  या कालावधीत  राबवण्यात येणाऱ्या इंधन बचत मोहिमेचा शुभारंभ कळंब आगारात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आगार व्यवस्थापक एस. डी. खताळ हे होते. तर प्रमुख पाहुणे कळंब तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास मुळीक, प्रा. मोहन जाधव, कार्यशाळा अधिक्षक बालाजी भारती, स्थानक प्रमुख आर. आर. जानराव सह आदी उपस्थित होते. यावेळी राज्य परिवहन महामंडळामध्ये कर्मचाऱ्यांनी इंधनाची बचत करून प्रत्येक आगार तोट्यातून नफ्यात कसा आणता येईल  याबद्दल मान्यवरांनी वाहक, चालक व यांत्रिक कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गोरे यांनी केले. तर आभार प्रभाकर झांबरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी वाहतूक नियंत्रक नामदेव जगताप, नितीन गायकवाड, शिंदे मॅडम, शेख मॅडम, चालक डि. एम. मुंडे, विलास जाधव हे उपस्थित होते. तर कार्यक्रम पार पाडण्यासाठी यांत्रिक कर्मचारी वाहक चालक आदींनी परिश्रम घेतले.    


 
Top