तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे मुलगा होत नाही म्हणून पतीने कोयत्याने वार करून पत्नीचा खून केल्याची घटना गुरुवारी दि.19 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.

या बाबतीत अधिक माहीती अशी की, धनंजय भारत माळी यांना तीन मुलीच जन्माला आल्या.  वंशाला दिवा म्हणून मुलगा होत नाही. याचा राग मनात धरून आपली पत्नी गोजर धनंजय माळी वय 28 हिचा गळा दाबून कोयत्याने वार करून खून केला. याबाबत मृताची बहीण शीलाबाई हरिदास माळी यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. धनंजय हा पत्नी गोजरबाई हिला नेहमी तुला मुलीच होतात, मुलगा होत नाही म्हणून मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास देत होता. त्याने गुरुवारी सायंकाळी याच कारणावरून मारहाण केली व गळा दाबून कोयत्याने वार करून खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सदरील माळी कुंटुंब यांना शेती नसुन रोजदारी करुन कुंटुबाची उपजिवीका भागवत होते. गोजरबाई यांना तीन लहान मुली आहेत. यातील दोन मुली शाळेला गेल्या होत्या. तेव्हा याने हे कांड केले. शुक्रवारी सायंकाळी काटगाव येथे गोजरबाईवर अंत्यसंस्कार करण्यात आले.


 
Top