धाराशिव (प्रतिनिधी)-  कळंब तालुक्यातील सापनाई येथील एकाची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाली होती. सायबर पोलिसांनी फसवणुकीचे 3 लाख 71 हजार रूपये त्यांना परत मिळवून दिले आहे.

सापनाई येथील रोहित अगरचंद पवार त्यांच्या मोबाईलवर अनोळखी इसमाने फोन करुन फिर्यादीना या टेलीग्राम ग्रुपवर जॉईन होण्यास सांगीतले होते. त्यानंतर फिर्यादींना   या नावाचे ॲप डाउनलोड करण्यास सांगून फिर्यादींना वेगवेगळे टास्क देउन गुंतवणूक करण्यास सांगीतले. त्यांनतर फिर्यादींने गुंतवणुक करण्यास होकार दिला असता फिर्यादींना जादा पैशाचे अमिष दाखवले. म्हणून त्यांनी टप्याटप्याने एकुण 5 लाख 59 हजार 959  गुंतवणुक केली. त्यांनतर फिर्यादींनी सदर इसमाकडे गुंतवणुक केलेल्या रक्कमेवर मिळालेल्या नफ्याची मागणी केली. फिर्यादींना टेलीग्राम ग्रुपमधून काढून टाकण्यात आले. सदर बाबत फिर्यादींची फसणुक झाल्याची खात्री झाली म्हणून त्यांनी सायबर पोलीस ठाणे, धाराशिव येथे ऑनलाईन तक्रार नोंदवली होती. सायबर पोलीसांनी तात्काळ तांत्रिक विश्लेषण केले असता फिर्यादींच्या खात्यातुन आरोपीच्या विविध बॅक खात्यात वर्ग झालेले सर्व बॅक खाते गोठविले होते. त्यांनतर सायबर पोलीसांनी संबंधित बॅकांच्या नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क करुन फिर्यादींच्या गेलेल्या रक्कमेपैकी 3 लाख 71 हजार रूपये फिर्यादींना परत करण्यात धाराशिव सायबर पोलीसांना यश आले आहे.

सदरची  कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश कासुळे, पोलीस हावलदार हालसे, नाईकवाडी, महिला पोलीस नाईक पौळ, पोलीस अमंलदार जाधवर, भोसले, मोरे, भोसले, तिळगुळे, कदम, काझी, सुर्यवंशी, महिला पोलीस अमंलदार खांडेकर, शेख यांच्या पथकाने केली आहे.

 
Top