कळंब (प्रतिनिधी)- कळंब बस आगारातील वाहक चालक व इतर कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या दि. 9 ऑगस्ट 2024 रोजीच्या धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दि. 1 ऑगस्ट रोजी  कळंब आगारात श्री दत्त मंदिर येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले होते.

शासनास सद्बुद्धी द्यावी व एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्या लवकरात लवकर पुर्ण कराव्यात. सातवा वेतन आयोग व राज्य शासनाप्रमाणे वेतन ही एकच मागणी आहे. आज एकत्रितपणे सरकारच्या विरोधात एक होऊन आपल्या हक्काची वेतनवाढ आणि प्रलंबित थकबाकी मिळवून घेण्यासाठी सर्व रा. प. कामगारांनी संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात एकत्र येऊन लढा देणे हिच काळाची गरज आहे. विरोधक आपल्या मागण्याविषयी एसटी कर्मचाऱ्यांत संभ्रम निर्माण करत आहे. दि.8,9 जुलै रोजी आझाद मैदानात उपोषण आंदोलनास कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याची दखल घेऊन मंत्री दादा भुसे व मंत्री उदय सामंत  यांनी चर्चेसाठी निमंत्रण दिले होते. पण येणाऱ्या काळात निवडणूक आचार संहिता लागू होऊ शकते.  त्यामुळे वेळ काढू पणा न करता थेट मुख्यमंत्री यांच्या सोबत चर्चा व्हावी यासाठी 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून महाराष्ट्रातील प्रत्येक आगारात धरणे आंदोलनास सुरुवात करायची आहे.

 
Top