ताज्या घडामोडी


कळंब (प्रतिनिधी)-  पगार वाढीसाठी व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अन्यायाविरुद्ध वेळोवेळी आंदोलन करणारा व शासनाचे लक्ष वेधणारा वाहक सचिदानंद पुरी वाहक क्रमांक 11638 याला 27 जुलै रोजी विभागीय वाहतूक अधीक्षक यांनी गैर हजेरी व औद्योगिक शांतता भंग करणे. या कारणाखाली निलंबित करण्यात आले आहे असे आदेश पारित केले आहे. तसेच मुख्यालय सोडून कुठेही जाऊ नये असे हे आदेश रा.प. प्रशासनाने दिल्याने वाहक, चालक व कर्मचाऱ्यांत मोठी खळबळ उडाली आहे. 

याबाबत अधिकृत असे की कळंब आगारातील  वाहक सचिदानंद पुरी हे गेल्या अनेक वर्षापासून एसटीच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय व अत्याचाराविरुद्ध लढा देत आहेत. त्यातच पगार वाढीसाठी त्यांनी अनेक दिवसापासून लढा सुरू केला आहे. या लढ्याला अद्यापही जरी यश आले नसले तरी मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक बैठक झाल्याची ही चर्चा वाहक चालकात होत आहे. त्यातच सचितानंद पुरी यांनी मागील दोन वर्षांपूर्वी झाडावर चढून आंदोलन केले होते. त्याचबरोबर काही दिवसांनी दूरध्वनी टावरवर चढून दोन वेळेस त्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनाचा महामंडळाने चांगलाच धसका घेऊन त्यांना यावेळेस मात्र गैरहजेरी व औद्योगिक शांतता भंग करणे या कारणाखाली विभागीय वाहतूक अधीक्षक यांनी निलंबित केले आहे.  या  निलंबनामुळे वाहक, चालक यांच्यात मोठी खळबळ उडाली आहे. 

एसटी कर्मचारी यांच्या हक्कासाठी  गेल्या तीन वर्षांपासून व एसटीच्या संप काळापासून मी एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सरकार दरबारी वेगवेगळ्या आंदोलनातून पाठपुरावा करत आहे. एसटी संप काळात 124 एसटी कर्मचाऱ्यांनी सततच्या आर्थिक विवेचनेतून आत्महत्या केल्या. तरी देखील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने दखल घेतली नाही.

 
Top