ताज्या घडामोडी


धाराशिव  (प्रतिनिधी) - नवी मुंबई व उरण येथे दोन महिलांवर बलात्कार करून त्यांची निर्घृणपणे हत्या करून अतिशय क्रूर कृत्य केले आहे. हा खटला अति जलद न्यायालयासमोर चालवून त्या भगिनींना न्याय मिळावा. तसेच त्या सर्व आरोपी नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी जिल्हा विधिज्ञ मंडळाच्यावतीने कॅन्डल मार्चचे आयोजन दि.30 जुलै रोजी करण्यात आले आहे. या मार्चमध्ये सर्व विधिज्ञ व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या ॲड. भाग्यश्री रणखांब यांनी केले आहे.

नवी मुंबई व उरण येथे दोन महिलांवर बलात्कार करून त्यांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. मुंबई सारख्या शहरात अशा प्रकारे महिलांची हत्या करून तिच्या प्रेताचे गुप्तांग कापून शरीराला छिन्न विछिन्न करण्याच्या हृदय हेलावून टाकणारा, काळीज पिळवटून टाकणारा विचित्र व घृणास्पद प्रकार घडला आहे. यातील आरोपीस पोलिसांनी अटक केली असून, त्या आरोपीस व नवी मुंबई येथील घटनेतील सर्व आरोपींना अति जलद न्यायालयासमोर खटला चालवून लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी. या मागणीसाठी व त्या घटनेतील मयत महिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दि.30 जुलै रोजी सकाळी 10 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे. महिलांवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराविरुद्ध निषेध करण्यासाठी सर्व विधीज्ञांसह नागरिकांनी या कॅन्डल मार्चमध्ये होऊन मयतांना न्याय देण्यासाठीच मोठ्या संख्येने सहभागी व्हावे , असे आवाहन ॲड. रणखांब यांनी केले आहे.

 
Top