तुळजापूर (प्रतिनिधी)-  तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील निजाम काळातील जुन्या मजबुत अशा नऊ मुतारी चोरीला गेल्या असुन, त्याची चौकशी करुन संबंधितावर कायदेशीर कार्यवाही करुन निजाम काळातील नऊ मुतारी चालु करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेने मुख्याधिकारी नंतर थेट जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, 1948 साली निजाम राजवटीतुन मराठवाडा मुक्त झाला. या मराठवाड्यातील महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या पावन नगरीत निजाम राजवटीमध्ये तुळजापूर शहरात 9 मुताऱ्या एस. टी. स्टँड, आंबेडकर चौक, प्रताप टॉकीज, जवाहर गल्ली, भवानी रोड, शुक्रवार पेठ, आर्य चौक, साळुंके गल्ली, कमानवेस, पुर्व मंगळवार पेठ अशा ठिकाणी बांधण्यात आल्या होत्या. परंतु गेली दहा ते बारा वर्षात त्या मुताऱ्या चोरीस गेल्या आहेत.

सदर विषयी संदर्भीय निवेदन मुख्याधिकारी नगर परिषद तुळजापूर यांना दिलेले असुन सदर निवेदनावर मुख्याधिकारी न.प. तुळजापूर यांनी अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. तरी जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तात्काळ चौकशी करुन व अभिलेखाची पाहणी चौरी गेलेल्या निजाम काळातील नऊ मुतारी चालु करुन संबंधितांवर योग्यती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा नाईलाजास्तरव तुळजापूर तालुका व शिवसेनेच्यावतीने आंदोलन छेडले असा इशारा निवेदनाद्वारे सेनेचे शाम अंबादास पवार यांनी दिला आहे.


 
Top