धाराशिव  (प्रतिनिधी)- श्री सिध्दीविनायक परिवाराची उद्योग निष्ठा महाराष्ट्राला आदर्शवत असल्याचे प्रतिपादन प्रख्यात कवी इंद्रजित भालेराव यांनी श्री सिध्दीविनायक परिवाराच्या स्नेहमेळाव्यात केले.

धाराशिव जिल्ह्यात नावलौकिकाचा ठसा उमटविणाऱ्या श्री सिध्दीविनायक परिवारातील कौटुंबिक सहकाऱ्यांचा शनिवारी 25 मे रोजी परिमल मंगल कार्यालय येथे स्नेहमेळावा पार पडला. यावेळी श्री सिध्दीविनायक परिवारातील बँकिंग, गूळ कारखाना, इन्शुरन्स तसेच शेती संबधित क्षेत्रात काम करणारे जिल्ह्यातील सर्व सहकारी परिवार उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मातोश्री श्रीमती मीनाताई कुलकर्णी तर प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात साहित्यिक कवी इंद्रजित भालेराव यांची उपस्थिती होती. यावेळी इंद्रजित भालेराव यांनी कवितेच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेचे उदाहरण देत दत्ता कुलकर्णी हे खूप चांगल्या पद्धतीने राजकीय क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात उत्तम काम करत आहेत असे गौरव उद्गार काढले. 

जिथे कापूस पिकत नाही अश्या सांगोला येथे सुतगिरणी उभा केली. तसेच यातून मिळालेल्या नफ्यातून त्यांनी महिलांच्या हाताला काम मिळवून दिले. आपल्या समाजावर कशी निष्ठा असावी हे स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्याकडून शिकलं पाहिजे त्यांनी जसे उद्योग सुरू केले व चालवले त्यांचेच प्रतिबिंब दत्ता कुलकर्णी यांच्यात पाहायला मिळाले असेही म्हणाले. या कार्यक्रमास एम.डी. देशमुख, ॲड.राम गरड, रवि केसकर, योगेश कुलकर्णी, ॲड.नितीन भोसले, ॲड. प्रतीक देवळे, दिनेश कुलकर्णी, बालाजी कोरे, बालाजी चव्हाण, संतोष जहागीरदार, गणेश कामटे, राजेश जाधव, देविदास कुलकर्णी, अरविंद गोरे, रामभाऊ सरडे व सर्व सहकारी व महिला माता भगिनी, कुटुंबीय उपस्थित होते.

 
Top