धाराशिव  (प्रतिनिधी)- मोठी बातमी समोर येत आहे. उस्मानाबादचे नामकरण धाराशिव तर औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्यास राज्य सरकारनं परवानगी दिली होती. दरम्यान उस्मानाबादचं नामकरण धाराशिव झाल्यानंतर नामांतरण विरोधी कृती समितीच्या वतीने याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून धाराशिवच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतरण धाराशिव झाल्यानंतर नामांतरण विरोधी कृती समितीच्या वतीने नामांतरण विरोधी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयानं फेटाळली आहे. न्यायालयाकडून धाराशिवच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. मुंबई उच्च न्यायालयात नामांतरणाबाबतच्या या याचिकेवर सुनावणी पार पडली. यावेळी उच्च न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय व अरिफ डॉक्टर या दोन न्यायमुर्तीच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.

राज्य सरकारने उस्मानाबादचे नामकरण धाराशिव तर औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्यास मंजुरी दिली होती. मात्र त्यानंतर धाराशिवच्या नामकरणाविरोधात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेकडे सर्वाचे लक्ष लागले होते. अखेर ही याचिका फेटाळण्यात आली आहे. न्यायालयाकडून नामांतरणावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.


 
Top