धाराशिव (प्रतिनिधी)- सुडाच राजकारण करणारे डॉ. पाटील यांचे कुटुंब स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारे कुटुंब आहे. ही माणसं महत्वकांक्षीपोटी जबरदस्तीने लोकांवर अन्याय करण्यामध्ये कोणतीही कसर सोडत नाहीत. बाप लेकाचा पराभव केला तसा सुनेचाही पराभव करा. पाटील कुटुंबींयांना धाराशिव जिल्हयाच्या राजकरणातून हद्दपार करा असे आवाहन आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांनी आळणी येथील प्रचार कार्यक्रमात केले.

पुढे बोलताना आनंदीदेवी राजेनिंबाळकर म्हणाल्या, राजकरणासाठी त्यांनी माझे पती पवन राजेनिंबाळकर यांची सुपारी देवून हत्या घडवून आणली. ज्यांना राजकरणाच्या प्रेमापोटी स्वत:चा भावाची हत्या केली हे लोक तुमचं काय भलं करणार? जिल्हयाचा काय विकास करणार? आनंदीदेवी राजेनिंबाळकर या पहिल्यांदाच प्रचारात सक्रिय झाल्या असून मतदार संघात प्रचारात दिसुन येत आहेत. त्यांच्या प्रचारादरम्यान जनतेतुन प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 

त्यांच्यासोबत कै. पवनराजे निंबाळकर यांच्या बहिण  शिलाताई पाटील, अनुराधा जाचक, निलावती लोमटे याही प्रचारात उतरल्या आहेत. आळणी येथील साधना कोरे, नंदाबाई कोरे, विद्या वीर, उमाताई माळी, जयश्री वीर, ज्योती वीर, रत्नमाला वीर, दैवशाला तोडकर, रेणुका वीर, राधा वीर,जयश्री कोरे,शितुजा कोरे, काँग्रेस पक्षाचे विनोद वीर, रवि कोरे, विनोद लावंड, अनंत बापु खोबरे, राजाभाऊ किरदत्त, सुनिल माळी, बबलू तोडकर, वैभव वीर, अजित वीर, शामसुंदर लावंड, अंबरूषी कोरे, अंकुश काका कोरे, विश्वजित वीर, समर्थ वीर यांच्यासह महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.


 
Top