बार्शी (प्रतिनिधी)- तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलांनी घर कसं चालवायचं? हा प्रश्न पडतो. अच्छे दिन येण्याचं तर सोडा पण आता 'होते ते दिवस बरे होते' असं म्हणायची वेळ आपल्यावर आल्याचे मत संयोजिनी राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रचारार्थ मुंगशी ता.बार्शी येथील सभेत त्या बोलत होत्या.

यावेळी संयोजिनीराजे म्हणाल्या की,गेल्या निवडणुकीत आपण ओम राजेनिंबाळर यांना आपले आशीर्वाद देऊन दिल्लीत पाठवले. त्यांना खासदार केले. तेव्हा आपली निशाणी धनुष्य बाण होता. पण आता आपलं चिन्ह मशाल आहे. ही मशाल तुम्ही घरोघरी पोहचविण्याचे अवाहन त्यानी यावेळी केले. ही निवडणूक आता फक्त धाराशिवसाठी महत्त्वाचे नाहीये. तर संपूर्ण देशासाठी महत्त्वाची आहे. 



 
Top