धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यास नगर परिषद प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत आहे. शहरवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबद्दल शहर काँग्रेसच्या वतीने वारंवार मुख्याधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांना अवगत करत आहोत. परंतु आपल्या प्रशासनामार्फत शहरवासीयांना दिलासादायक कामकाज होत नाहीये. म्हणून आज शहर काँग्रेसच्या वतीने नगर परिषद येथे धरणे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली.

शहरातील सर्व भागात प्रचंड प्रमाणात अस्वच्छता व दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. त्यामुळे शहरात स्वच्छता वेळेवर व योग्य प्रकारे करण्यात यावी. तातडीने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावा. शहरातील रस्ते व नाल्यांची तात्काळ दुरुस्ती व नूतनीकरण करण्यात यावे. यासह 12 मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यात आले.

आंदोलनानंतर मुख्याधिकारी यांचे दालनात शिष्टमंडळाने मुख्याधिकारी वसुधा फड यांचेशी सविस्तर चर्चा केली. मागण्यांवर सकारात्मक पाऊले उचलावीत. अन्यथा आणखी तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा ही यावेळी देण्यात आला. या आंदोलनात काँग्रेसचे राजाभाऊ शेरखाने, प्रशांत पाटील, मेहबूब पाशा पटेल, अग्निवेश शिंदे, सिद्धार्थ बनसोडे,  उमेश राजेनिंबाळकर, दर्शन कोळगे, धनंजय राऊत, विजय मुद्दे, शिला उंबरे, आयुब पठाण, अशोक बनसोडे, प्रभाकर लोंढे, अंकुश पेठे, अहमद चाऊस, कफिल सय्यद, शहाजी मुंडे , जयसिंह पवार, सुरेंद्र पाटील, मूहिब शेख, अब्दुल लतीफ, अभिषेक बागल, मिलिंद गोवर्धन सहभागी होते.


 
Top