धाराशिव (प्रतिनिधी)- ईव्हीएम मशीन ऐवजी बॉयलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी महाराष्ट्र शेतकरी शेतमजूर संघटना महाराष्ट्र मुंबई यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे एका निवेदन करण्यात आली आहे.

 दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, संभाव्य राज्याच्या व केंद्रीय निवडणुकीसंदर्भात मतदारांचा ईव्हीएम मशीनवर संशय निर्माण झालेला असून प्रजासत्ताक गणराज्याची निर्मिती मतांमधून होत नसून केवळ जपानने निर्माण केलेल्या ईव्हीएम मशीनने होते हि बाब अत्यंत दुर्दैवी आहे. ज्या जपानदेशान ईव्हीएम मशीनची निर्मिती केली त्या देशात बॉयलेट पेपरचा मतदानासाठी वापर केला जातो. थेट सादर मशीनचा वापर केला जात नाही. ईव्हीएम मशीनद्वारे मतांची हेराफेरी केली जाते ती कशी केली जाते हे 5 राज्यांच्या निवडणुकीनंतर एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने दिल्लीच्या जंतरमंतर रोडवर प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच या निवडणुकीनंतर मध्यप्रदेश व राजस्थानमधील सुमारे 15 ते 20 हजार मतदारांनी ईव्हीएम मशीनची तक्रार नोंदविली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना त्यात वाट्टेल ते करता येते अशी परिस्थिती असल्याने जपान, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन व अमेरिका या मोठ्या देशातही निवडणुकीसाठी ईव्हीएम मशीनचा वापर केला जात नाही. तेथे बॉयलेट पेपरवरच मतदान घेतले जाते. असे असताना निर्भय, निर्मळ लोकशाही वाचवण्यासाठी बॉयलेट पेपरवर आगामी निवडणुकीमध्ये मतदान घ्यावे या प्रक्रीयेमुळे जनतेचा लोकशाही वरचा विश्वास वाढेल. 

तसेच भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 334 मध्ये निवडणुकीतील आरक्षण व त्याची मुदत 70 वर्षापर्यंत ठेवलेली होती. ती मुदत दि. 26 जानेवारी 2022 मध्येच संपुष्टात आलेली आहे. त्यामुळे सदर आरक्षणाची मुदत वाढ दिली किंवा नाही हे पाहूनच निवडणूक घ्यावी. या मागणीसाठी दि. 24 जानेवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष कोंडाप्पा सदाशिव कोरे, कार्याध्यक्ष प्रा. मारुती कारकर, तेजस भालेराव, उमाकांत जमाले, अर्जुन आवाकळे आदी उपस्थित होते.


 
Top