धाराशिव (प्रतिनिधी)-अनुसूचित जाती आरक्षणामध्ये अ,ब, क,ड वर्गीकरण करा तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा. या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे गेली 16 नोव्हेंबर पासून पुणे ते नागपूर आरक्षण क्रांती पाई पदयात्रा करत आहेत. पदयात्रेला 20 दिवस झाले असून व चालून चालून त्यांच्या पायाला फोड येऊन त्यांच्या पायातून रक्त येत आहे. तरी देखील सरकारने पदयात्रेची दखल घेतलेली नाही किंवा पदयात्रा थांबवण्यासाठी विनंती केलेली नाही अशा नाकरत्या सरकारचा निषेध म्हणून लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.मारुती क्षीरसागर यांच्या नेतृत्वामध्ये दि. 7 डिसेंबर रोजी सोलापूर धुळे महामार्गावरील वाशी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करून निवेदन देण्यात आले.
सदर रास्ता रोको आंदोलन तब्बल एक तास चालल्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या या आंदोलनात लहुजी शक्ती सेनेचे महासचिव बालाजी गायकवाड तसेच जिल्हाध्यक्ष विजय क्षीरसागर, युवक जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ साठे,जिल्हा कार्याध्यक्ष संदीप मोरे, जिल्हा संघटक हरी क्षीरसागर, समाधान क्षीरसागर, नवनाथ क्षीरसागर, आदेश शिंदे विकास क्षीरसागर,दीपक क्षीरसागर सुरेश कांबळे,विशाल कांबळे कळंब तालुका सचिव लक्ष्मण थोरात,भरत सिरसाट,किरण गायकवाड,करण जाधव,अमोल कांबळे,लक्ष्मण क्षीरसागर,विकास गुलाब क्षीरसागर दीपक श्रीरंग क्षीरसागर, जयाजी कांबळे यांचेसह शेकडो कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते.