धाराशिव (प्रतिनिधी)-येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

सर्वप्रथम शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे आणि संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या पुतळ्याला महाविद्यालयाचे प्राचार्य तथा मराठवाडा विभागप्रमुख डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक डॉ. डी.वाय साखरे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात आढावा घेतला.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .जयसिंगराव देशमुख म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र कष्ट करून देशाची राज्यघटना तयार केलेली आहे. ही राज्यघटना जगात सर्वश्रेष्ठ आणि सर्वात मोठी आहे. या राज्यघटनेचे पावित्र्य राखणे ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. यावेळी महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य बबन सूर्यवंशी, प्रबंधक  दिलीप लोकरे व सर्व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.


 
Top