धाराशिव (प्रतिनिधी)-पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत हे आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी कळंब तालुक्यातील येरमाळा येथे भेट देऊन मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी उपोषण करतांना 8 सप्टेंबर रोजी मध्यरात्री शहाजी कदम यांनी आत्महत्या केली.कदम यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी पालकमंत्री डॉ.सावंत यांनी मयत शहाजी कदम यांच्या कुटूंबियांची भेट घेतली. 

यावेळी पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांनी कदम कुटूंबियांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.यावेळी त्यांनी शहाजी कदम यांच्या मुला मुलींचे पालकत्व स्वीकारून त्यांची शैक्षणिक तसेच त्यांना पुढे रोजगार उपलब्ध करून देऊन मुलामुलींची वैवाहिक व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी स्वीकारली.तसेच त्यांनी परिवाराशी संवाद साधला. मयत शहाजी कदम यांच्या परिवाराला कुठलीही अडचण असल्यास त्यांनी थेट संपर्क साधावा असे सांत्वन भेटीच्या वेळी सांगितले. तत्पूर्वी उस्मानाबाद येथे मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन संवाद साधला.


 
Top