धाराशिव (प्रतिनिधी)-देशाच्या सैन्य दलातील जवानांकडून प्रेरणा घेऊन येणाऱ्या पिढीने भारतीय सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले. आज 13 सप्टेंबर रोजी तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ऑपरेशन पोलोमध्ये सहभागी झालेले हवालदार हरिराज सिंघ आणि हवालदार मांगेराम यांच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर व त्यांच्या वारसांच्या सत्कार समारंभ प्रसंगी उपस्थित सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना केले.

यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील,हुतात्मा जमादार हरिराज सिंघ यांचे पुत्र कर्नल देवेंद्र सिंग शिहोरी, नातू कर्नल विवेक शिहोरी, हुतात्मा मांगेराम यांचे पुत्र सुनील मल्हन, इतिहास संशोधक प्रा.डॉ.सतीश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी शहीद सैनिकांच्या वारसांना मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. 3 कॅवेलरीचे जवानांना  श्री तुळजाभवानी देवीचे चित्र देऊन सन्मानित करण्यात आले.आमदार राणाजगजीत सिंह पाटील यांनी शहिदांच्या स्मारकासाठी 25 लक्ष रुपये खर्च करून भव्य स्मृती स्तंभ उभारण्यात येईल अशी घोषणा केली.    

      प्रास्ताविक डॉ. सतीश कदम यांनी केले. याप्रसंगी हुतात्म्यांच्या वारसदार आणि भारतीय सैनिकांच्या हस्ते माझी माती माझा देश या कलशात तुळजापूर तालुक्यातील माती भरण्यात आली. यावेळी महसूल विभागाचे अधिकारी आणि माजी सैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top