धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिवमध्ये प्रथमच भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था येथे रेशीम कोष उत्पादक उद्यमी प्रशिक्षणाची सुरवात भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था उस्मानाबाद येथे  दि. 26 जून  रोजी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते रेशीम कोष उत्पादक उद्यमी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. 

या प्रसंगी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षण घेवून आपला स्वतःचा रेशीम कोष निर्मिती  व्यवसाय सुरु करावा आणि धाराशिव  जिल्ह्यामध्ये रेशीम कोष विक्रीचे मार्केट सुरु करावे. व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारे ज्ञान हे या प्रशिक्षणाच्या माध्यमातून घेवून  स्वतः उद्योजक बनून इतरांना हि रोजगार मिळवून द्यावा असे हि सांगितले.

यावेळी संस्थेचे संचालक मुकेश कुमार यांनी संस्थेबद्दल माहिती सांगितली. प्रशिक्षण घेवून यशस्वी व्यवसाय सुरु करण्यासाठी संस्था 2011 पासून ग्रामीण भागातील युवकांना मार्गदर्शन करत आहे. या प्रसंगी  महेंद्र कुमार मुख्य प्रबंधक बँक ऑफ महाराष्ट्र, एम. जे. लावंद  जिल्हा रेशीम कार्यालय, बालाजी पवार, गणेश आदटराव व अतुल लुगडे आदी प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जीवनज्योती सरपाळे आरसेटी प्रशिक्षिका यांनी केले. तर आभार अवधूत पौळ यांनी मानले.


 
Top