तुळजापूर / प्रतिनिधी-
1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त नगरपरिषद मध्ये आयोजित ध्वजारोहन कार्यक्रमास गैराहजर राहणाऱ्या अकरा कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी अरविंदनातू यांनी कारणा दाखवा नोटीस बजावल्याने ऐकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र दिनाचे १मे औचित्य साधुन १मे रोजी सर्वञ शाषकिय निमशाषकिय कार्यालयांन मध्ये ध्वजारोहन कार्यक्रम घेतला जातो यास अधिकारी कर्मचारी उपस्थितीत राहणे गरजेचे असताना नगरपरिषद मधील तब्बल अकरा कर्मचाऱ्यांनी ध्वजारोहणास दांडी मारल्याने मुख्याधिकारी अरविंदनातू यांनी अकरा कर्मचाऱ्यांना कारणा दाखवा नोटीस बजावुन त्यांना चोवीस तासाचा आत नोटीसीला उत्तर देण्यास सांगितले उत्तर समाधानकारक नाही आले तर माञ ऐक दिवसाचे वेतन कपात करण्याचा इषारा नोटीसात दिला आहे.