धाराशिव /तुळजापूर / प्रतिनिधी-

   जुनी पेन्शन योजना लागू करावी यावर अन्य मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यानी १४ मार्च एक दिवशी  संप पुकारला आहे. या संपात धाराशिव जिल्ह्यातील ४१ सरकारी, कर्मचारी संघठना   सहभागी होणार आहेत अशी माहिती  राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघठनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बालाजी पांचाळ उपस्थित होते. 

मंगळवार दि. १४ मार्च रोजी तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव येथ्ून सकाळी ११ वाजता मोर्चास प्रारंभ होणार आहे. या मोर्चात १० हजारापेंक्षा जास्त कर्मचारी सहभागी होतील, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. यावेळेस संघठनेचे साहेबलाल तांबोळी व बशीर तांबोळी यंानी इतर मागण्यांचा उल्लेख जरी यावेळी करण्यात आला असला तरी एकच मशिन जुनी पेन्शन ही आमची प्रमुख मागणी राहणार आहे. पेन्शन हा आमचा नैसर्गीक हक्क आहे. आमदार, खासदार पाच वेळेस निवडुण आल्यानंतर ही त्यांना प्रत्येकी पाच पेन्शन मिळतात. परंतू त्यांना आमचा विरोध नाही, सरकारने आमच्या मागण्याची दखल घ्यावी, अशी मागणी ही करण्यात आली आहे. दखल न घेतल्यास १५ मार्च पासून बेमुदत संप पुकाराला जाईल असेही सांगण्यात आले. 

तर चव्हाण म्हणाले की,  नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना चालू करावी व इतर मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती  संघटना महाराष्ट्र डीएनई- १३२ महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डीएनई- -१३६ तसेच सर्व शासकीय, निमशासकीय शिक्षक ,शिक्षेतर कर्मचारी या सर्वांनी मिळून १४ मार्च पासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

 धाराशीव जिल्ह्यातील सर्व कर्मचारी कुंटुबासहीत मोर्चात सहभागी होणार आहेत यामध्ये सकाळी ११ वाजता धाराशिव येथे स्पोर्ट मैदान येथुन जिल्हाअधिकार्यालपर्यंत निघणार आहे तेव्हा राज्यातील या बेमुदत संपामध्ये धाराशिव (उस्मानाबाद) जिल्यातील ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी सहभागी होणार असणेबाबत राज्य कायदे सल्लागार देविदास चव्हाण व जिल्हा अध्यक्ष महादेव जगताप व सरचिटणीस सुदर्शन घोगरे यांनी  कळविले आहेत. निवेदनावर महादेव जगताप, सुदर्शन घोगरे, देविदास चव्हाण गुरुशरण पारे, आगरकर मॅडम , देवानंद रेड्डी, विजयसिंह नलावडे , लक्ष्मण जकेकुरे व सर्व तालुका अध्यक्ष/ सचिव यांनी स्वाक्षरी केली.



 
Top