तुळजापूर / प्रतिनिधी-
भाविकांची वर्दळ असणाऱ्या वासुदेव गल्ली, वडार गल्ली, गंगा निवास, घाटशीळ रोड या भागात मागील दिड महिन्यापासुन कचरा गाडी येत नसल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असुन सदरील कचरा तातडीने उचलावा तसेच ठेकेदाराचे स्वच्छता बिल अदा करु नये अन्यथा तुळजापूर नगरपरिषद कार्यालयात कचरा टाण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस ने निवेदन देवुन दिला आहे. निवेदनावर मुन्ना पवार, रसाळ, बालाजी पवार, महेश शिंदे, जितेश सोनवणेसह अनेक रहिवाशांच्या स्वाक्षऱ्या आहेत.