उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 केंद्र शासनाच्या स्टॅन्ड अप इंडिया योजनेंतर्गत अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउद्योजकांना मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्याबाबत निर्देशीत केले आहे.

 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाने अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउद्योजकांसाठी स्टॅन्ड अप इंडिया ही योजना सुरु केली आहे. महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय व विेशेष सहाय्य विभाग अन्वये जिल्हयातील अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील 18 वर्षावरील नवउद्योजकांना 10 टक्के स्व-हिस्सा भरणा केल्यानंतर आणि बँकेने अर्जदारास स्टॅन्ड अप इंडिया योजनेंतर्गत 75 टक्के कर्ज मंजुर केल्यानंतर उर्वरित फ्रंट अँन्ड एंड सबसिडी अनुषंगाने नवउद्योजकांना प्रकल्प मुल्यांच्या 15 टक्के हिस्सा (अनुदान) शासनामार्फत देण्यात येते.

 तरी पात्र इच्छुक नवउद्योजकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त बी.जी. अरवत  यांनी केले आहे.


 
Top