उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणांमध्ये अडकलेले शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर मुंबई येथील सत्र न्यायालयात सुनावणी दरम्यान त्यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने दि.९ नोव्हेंबर रोजी फटाक्यांची आतिषबाजी व मिठाई वाटून जल्लोष साजरा केला.

यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे, जिल्हा बँकेचे संचालक संजय देशमुख, दिलीप पाटील, माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे,  उपशहर प्रमुख बंडू आदरकर, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, नपचे माजी गटनेते सोमनाथ गुरव, एच. एम. देवकते, माजी पंस सदस्य संग्राम देशमुख, पंकज पाटील, रवी वाघमारे, गणेश खोचरे, अतिश पाटील, सुरेश गवळी, मनोज केजकर, गफूर शेख, मनोज साठे, दिनेश बंडगर, कृष्णा साळुंके, गणेश साळुंके, संकेत सुर्यवंशी, रवी कोरे, पिंटू आंबेकर, सादिक शेख, महेश लिमये, सत्यजित पडवळ, विजय ढोणे, सतीश लोंढे, बापू पडवळ, निलेश साळुंके आदीसह शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top