तुळजापूर / प्रतिनिधी-
महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या निद्रा कालावधीत नेञ, नथ, बिंदी हे तीन अलंकार घातले जातात इतर सुर्वण अलंकार घातले जात नाहीत.
श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवातील सिमोलंघन सोहळा संपताच देविजींची सिंहगाभा-यात पाच दिवसाची श्रमनिद्रा आरंभ होते. या कालावधीत देविजीना सुगंधी तेलाचा अभिषेक केल्यानंतर देवीची पलंगावर अलंकार पूजा संपन्न होते. या मध्ये फक्त तीनच अलंकार देवीला घातले जातात.डोळे नेञ (डोळे) , नथ बिंदी एवडेच अलंकार घालण्याची परंपरा आहे .