तुळजापूर / प्रतिनिधी-
अश्विनी पोर्णिमानिमित्ताने ओमसाई माऊली चँरीटेबल ट्रस्ट वतीने मोफत अन्नदानाचा शुभारंभ शनिवार दि.८रोजी डीवायएसपी भुरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
मागील सलग २३ वर्षांपासून चालत येणाऱ्या भाविकांसाठी ओम साई माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत अन्नदान घाटशिळ,घाटखाली करण्यात येत आहे. संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत काळे हे मुळ तुळजापूरचे असुन ते सध्या मुंबईत केटरिंगचा व्यवासाय करतात. कुमार इंगळे, गौतम रोचकरी, महेंद्र कावरे, दत्तात्रय गवळी, अर्जुन साळुंखे रुद्र पवार, वाघमारे यांची उपस्थिती होती.