उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ सद्भावना दिन प्रत्येक वर्षी साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले आणि सद्भावना दिनाची शपथ घेण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार प्रवीण पांडे, गणेश माळी, नायब तहसीलदार पंकज मंदाडे तसेच कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.


 
Top