उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे खरीप हंगामाच्या सर्व पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास नैसर्गीक आपत्तीने हिसकावला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळातील पीकांचे ‘सततचा पाउस हा निकष ग्राह्य धरून केंद्र सरकारच्या NDRF आणि राज्य शासनाच्या SDRF निकषाप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणेकरीता तात्काळ पंचनामे करावे आणि एकाही शेतकऱ्याची शेतजमीन पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही ही दक्षता घ्यावी अशा सुचना धाराशीव लोकसभा मतदारसंघाचे खासदार  ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी   वाशी तालूक्यातील सरमकुंडी, तांदळवाडी, जवळका, शेंडी, पिंपळगाव (क), हातोला, पारगाव यांसह तालूक्यातील सततच्या पावसामुळे शेतीपिकाचे नुकसान झालेल्या गावांतील पाहणी दौऱ्यावेळी प्रशासनाला दिल्या

 याप्रसंगी संपर्क प्रमुख शंकर बोरकर तात्या, जिल्हा प्रमुख गौतम लटके सर, विधानसभा समन्वयक दिलीप शाळू महाराज, तालूका प्रमुख विकास मोळवणे, युवा शहर प्रमुख, वाशी, लायक भाई तांबोळी, शहर प्रमुख अनिल गवारे, वाशी बाळासाहेब उंदरे, तात्या गायकवाड गट प्रमुख, तहसीलदार नरसिंग जाधव, तालुका कृषी अधिकारी, संतोष कोयले, गट विकास अधिकारी राजगुरू व शेंदरे उप अभियंता यांच्यासह शेतकरी, नागरिक आणि संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.     

 

 
Top