तुळजापूर / प्रतिनिधी-
हे श्रीचे राज्य सुराज्य करण्यासाठी या संघटनेची निर्मिती केली असुन सुराज्य रक्षणासाठी ही संघटना राज्यभर काम करुन प्रस्थापीतांच्या विरोधात विस्थापीत्यांना न्याय देणार असुन वेळे प्रसंगी राजकारणात उतरण्यास ही संघटना मागेपुढे पाहणार नाही,असे प्रतिपादन छञपती संभाजीराजे यांनी केले.
मंगळवार दि. ९रोजी श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेवुन स्वराज्य संघटनेचा शुभारंभ व ध्वजाचे विमोचन व पहिल्या शाखेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी प्रसंगी स्वराज्यसंघटना राजकारणात उतरण्यास मागेपुढे पाहणार नाही , मुखमंञी एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्यासाठी लक्ष केंद्रित करावे छञपती संभाजीराजे यांनी असे आवाहन करून महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात सापडला असुन त्यास हेक्टरी ७५ हजार रुपये तात्काळ मदत द्यावी अशी मागणी केली . यावेळी शिवप्रेमी मोठ्या संखेने उपस्थितीत होते.