नळदुर्ग  / प्रतिनिधी-

 राष्ट्रीय महामार्ग ओलांडुन श्री क्षेत्र रामतीर्थ कडे जाणाऱ्या रस्त्यावरील रामभक्तांना धोकादायक ठरणारे काटेरी झुडपे व कांही झाडे रामभक्तांनी दि.२३ जुलै रोजी श्रमदान करून काढुन टाकुन हा रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत केला आहे.

अलियाबद पुलाजवळुन महामार्ग ओलांडुन श्री क्षेत्र रामतीर्थकडे रामभक्तांना जावे लागते. महामार्ग ओलांडुन जात असतांना रामभक्तांना सध्या आपला जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. कारण  महामार्ग ओलांडुन जात असताना महामार्गालगत व रामतीर्थकडे जाणाऱ्या रस्त्यालगत रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडे--झुडपे, लहान मोठी झाडे मोठ्याप्रमाणात आले असल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजुनी भरधाव वेगाने येणारी वाहने रामभक्तांना दिसत नाहीत. त्यामुळे याठिकाणी अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.दि.२१जुलै वार गुरुवार रोजी याठिकाणी मोठा अपघात होता, होता वाचला. सध्या श्री क्षेत्र रामतीर्थ येथे दर शनिवारी सकाळी व दर गुरुवारी संध्याकाळी याठिकाणी ५०० ते ६०० रामभक्त हनुमान चालीसा व सुंदरकांड पठणासाठी उपस्थित राहत आहेत.

रामतीर्थकडे जाणाऱ्या रस्त्यावरील भक्तांसाठी धोकादायक ठरणारे व  रस्त्यालगत असणारे काटेरी झाडेझुडपे व लहान मोठी झाडे रामभक्तांनी श्रमदान करून काढुन टाकली आहेत यामुळे रामतीर्थकडे जाणारा रस्ता आता वाहतुकीसाठी सुरळीत झाला आहे. यावेळी नळदुर्ग, रामतीर्थ, लोहगाव व परीसरातील रामभक्तांनी श्रमदान केले आहे.

 महामार्ग ओलांडुन रामतीर्थकडे जात असताना अपघात होऊ नये यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने तात्काळ रामतीर्थकडे जाणाऱ्या रस्त्यावर महामार्गालगत दिशादर्शक फलक उभा करण्याबरोबरच महामार्गावरील भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांचा वेग याठिकाणी कमी व्हावा यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी रामभक्तांनी केली आहे. तात्काळ याठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभागाने उपाययोजना केल्या नाहीत तर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्याचा इशारा रामभक्तांनी दिला आहे.

 
Top