उस्मानाबाद / प्रतिनिधी-

माजी राज्यमंत्री तथा परंडा-भूम-वाशी मतदारसंघाचे आमदार प्रा.तानाजीराव सावंत यांची महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागावी याकरिता आमदार सावंत समर्थकांच्या वतीने   धारासूरमर्दिनी देवीची महाआरती करुन साकडे घातले. माजी उपनगराध्यक्ष सुरज राजाभाऊ साळुंके यांच्या  पुढाकारातून हा महाआरती सोहळा धारासूरमर्दिनी मंदिरात पार पडला.

यावेळी योगेश तुपे, प्रणील रणखांब, विलास लोकरे, सागर कदम,  गगन आगलावे, आकाश माळी, अविनाश टापरे, दिनेश तुपे, लखन झिरमिरे, विशाल हिंगमिरे, मयुर आडसुळ, नितीन देवकते, महेश मगर, अतुल टापरे, सागर कदम, बबलू वंडरे, बबलू नवले, राकेश ठवरे, नागेश थोरबोले, कुणाल धोत्रीकर, ललन पाटील  सुनिल काळे, आदित्य गवंडी, नागेश वर्‍हाडे, गणेश चौधरी, ओंकार मैराण, गणेश जाधव, अंकुश मुळे, सचिन मडके, सुरज राऊत रंजित चौधरी अतुल,महेश देवकाते, सचिन मडके, अक्षय देवकते, आकाश शेडगे निखिल माने, दिनेश जाधव, आण्णा मगर, अमोल गायकवाड संकेत हाजगुडे यांच्यासह शिंदे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 सावंत यांना मंत्रीपद मिळाल्यास जिल्ह्याचा विकास होईल -  साळुंके

उस्मानाबाद हा मागासलेला जिल्हा आहे. देशातील मागासलेल्या जिल्ह्यात धाराशिव तिसर्‍या क्रमांकावर आहे. ही ओळख पुसण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामे होणे अपेक्षित आहे. आमदार तानाजीराव सावंत यांना मंत्रीमंडळात संधी मिळाल्यास  जिल्हयाचा विकास होईल , असे माजी उपनगराध्यक्ष सुरज साळुंके यांनी सांगितले.


 
Top