उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मांजरा, तेरणा व तावरजा नदीवरील बराज, को. प. बंधारेच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा सुरु आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अतिवृष्टीची शक्यता असल्याने प्रकल्पात येणा-या पाण्याचे प्रमाण अधिक असू शकते त्यामुळे हे प्रकल्प केंव्हाही निर्धारित पातळीस भरण्याची शक्यता आहे.हे पाणी मांजरा, तेरणा व तावरजा नदीमार्गे सोडावे लागणार आहे. तेंव्हा या नदी काठाच्या ग्रामस्थ आणि शेतक-यांनी दक्षता घ्यावी, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. 

 मांजरा, तेरणा व तावरजा नदीकाठावरील शेतकरी किंवा नदीकाठी वस्ती करुन राहीलेल्या ग्रामस्थ व शेतक-यांना हा सावधानतेचा इशारा लातूर पाटबंधारे विभाग क्र. 1 लातूरचे कार्यकारी अभियंता रो.सु. जगताप यांनी दिल आहे.

 
Top