उस्मानाबाद / प्रतिनिधी-

विद्यार्थ्यांनी विज्ञानातून कायदा शिकावा, केवळ कायदा न शिकता त्याला विज्ञानाचे संदर्भ जोडले पाहिजे तसेच विज्ञानातील संकल्पना कायद्याशी समरस करून त्या शिकल्या पाहिजेत असे मत सेवानिवृत्त न्यायमूर्ती तथा गोवा राज्याचे लोकायुक्त अंबादास जोशी यांनी व्यक्त केले. विद्यार्थी यांनी अध्ययन काम कसे करावे यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ बापुजी साळुंके विधी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता डॉ. बापूजी साळुंखे व्याख्यानमाला महाविद्यालयाच्या IQAC विभागांतर्गत चालवण्यात येते. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ व्ही जी शिंदे, IQAC समन्वयक प्रा. नितीन कुंभार, आर पी कॉलेज प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख,वात्सल्य सामाजिक संस्था मंगरूळचे सचिव उमाकांत मिटकर,ज्येष्ठ विधीज्ञ श्रीकृष्ण दानवे उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य शिंदे, सूत्रसंचालक डॉ. स्मिता कोल्हे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा श्रियश मैंदरकर यांनी केले.या प्रसंगी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होणे करीता परिश्रम घेतले.

 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी संवाद शैली वापरून विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना कायदा विषय सोपा जावा म्हणून विज्ञानाच्या संकल्पना या कायदा शिकत असताना कशा वापरायच्या हे शिकवले. विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनाची सवय लावावी त्यासोबतच तणावमुक्त आरोग्याची काळजी कशी  घ्यावी हे सुचवले.

 कायदे दुरुस्ती करायला हवी हा राजकीय युक्तीवाद आहे.सद्य कायदे चांगले लोकोपयोगी आहेत.अभ्यास न करता कायद्यावर टीका करणे अयोग्य आहे. लोकयुक्त कायदा हा व्यवस्थित बनविला नाही अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली,अण्णा हजारे यांचे तोंड बंद करण्यासाठी लोकायुक्त कायदा केला अशी टिका त्यांनी केली.

 विद्यार्थ्यांनी अभ्यास,व्यायाम,योग करणे गरजेचे आहे.आयुष्यातले काही क्षण शिकण्या साठी घालविले पाहिजेत.शब्द संग्रह वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी मराठी इंग्रजी वृत्तपत्र तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी वाचावे. कायद्याच्या मागील तरतूदी व हक्क शोधणे गरजेचे आहे,कायद्याची मूलतत्वे न्यायमूर्ती जोशी यांनी उदाहरण देऊन समजावून सांगितली.  मराठी भाषा सर्व बाबींच्या अनुषंगाने समृद्ध व संपन्न आहे. जो देशाटन् करून येतो तो संपूर्ण शिकतो त्याला ज्ञानाचा खजिना मिळतो व शिकायला मिळते.वकील, न्यायाधीश व शिक्षक यांना वक्तृताव चांगले आले पाहिजे.

 न्यायाधीश व स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी लिहण्याचा सराव करणे गरजेचे आहे तसेच मुलाखत देताना काय बोलावे व काय बोलू नये याचा विचार करावा तसेच प्रश्नाची उत्तरे प्रामाणिकपणे द्यावीत असे सांगत त्यांनी विद्यार्थी यांना यशस्वी होण्याचा मंत्र दिला.

 
Top