उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तुळजापुर तालुक्यातील कदमवाडी येथील वारकऱ्यांचा अपघाती मृत्यु झाल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत भरीव मदत करावी अशी मागणी आमदार कैलास घाडगे पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यानी तसे पत्र श्री. ठाकरे याना दिले असुन त्याबद्दल ते सकारात्मक असल्याचेही आमदार घाडगे पाटील यानी सांगितले आहे. 

कदमवाडी (ता.तुळजापुर)येथील वारकरी हे पंढरपुर येथे ट्रॅक्टरने प्रवास करुन दर्शनासाठी जात होते. वाटेत जाताना त्यांच्या वाहनाचा अपघात होऊन चार वारकऱ्यांचा मृत्यु झाला आहे. त्यामध्ये १९ वारकरी हे गंभीर जखमी झाले असुन त्यापैकी चार वारकरी हे अतिगंभीर असुन त्यांची परिस्थिती नाजूक आहे. त्यांना उपचाराचा खर्च देखील पेलवण्याची आर्थिक स्थिती नाही, शिवाय जे मयत झालेले आहत. त्याच्या कुटुंबावर मोठा आघात झाला असुन त्यांना सावरण्यासाठी शासन म्हणुन आपण मदत करावी अशी विनंती आमदार घाडगे पाटील यानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत या वारकऱ्यांना व मयत झालेल्या वारकऱ्यांच्या नातलगांना भरीव आर्थिक सहाय्य करुन सहकार्य करावे अशी विनंती आमदार घाडगे पाटील यानी केली आहे. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांची आमदार ज्ञानराजजी चौगुले यांच्यासह भेट घेऊन त्यानी ही घटना त्यांच्या कानावर घातली आहे, यावर मुख्यमंत्री देखील सकारात्मक असल्याचे आमदार घाडगे पाटील यानी सांगितले आहे.


 
Top