उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारताचे पाचवे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरणसिंह यांच्या जयंतीनिमित्त दिनांक २३ रोजी कृषी महाविद्यालय आणि गडपाटी येथे राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.क्रांतीकुमार पाटील हे होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व चौधरी चरणसिंह यांना आदरांजली वाहण्यात आली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ क्रांती कुमारपाटील बोलताना म्हणाले की,”शेतकरी पुत्र व कृषी निगडीत विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे गिरवताना ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कृषिदूत म्हणून काम करणे गरजेचे आहे.आपण भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक क्षेत्राचे घटक आहोत याचा आपणास सार्थ अभिमान वाटला पाहिजे. ते पुढे म्हणाले की, जोपर्यंत आपण कृषी क्षेत्राकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघणार नाही व शेतकरी पुत्र म्हणून उत्पादन व विपणन क्षेत्रामध्ये योगदान देणार नाही. तोपर्यंत कृषी क्षेत्रात मरमर राबणा-या शेतकऱ्यांऐवजी दलाली किंवा मध्यस्थी करून विक्री करणारा व्यापारी वर्ग आपली पोळी भाजून घेईल.

कृषी कीटकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. गुरव पि.के. आपल्या मार्गदर्शनातून म्हणाले की शेतकरी दिन केवळ समाज माध्यमांत स्टेटस ठेवण्यापुरता न साजरा करता शेतकरी विकासासाठी एक चळवळ उभी राहिली पाहिजे. त्यांनी विद्यार्थ्यांना शेती व्यवसायातील व्यथा व परिश्रम यावर सविस्तर मार्गदर्शन केले व शेती विषयक कवितांच्या माध्यमातून शेती विषयक प्रोत्साहन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सुतार एन.एस. यांनी केले तर यावेळी प्रा.बंडे व महाविद्यालयातील विद्यार्थी सुमित गंगथडे व अच्युत गिरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  यावेळी प्रा.फडतरे, प्रा.सचिन खताळ, प्रा.शेटे डी.एस., प्रा.भालेकर एस. व्ही., प्रा. बुरगुटे के. ए., प्रा.गायकवाड पी.ए., प्रा.पवार ए.डी., प्रा.गार्डी ए. जि., प्रा.साठे एम.पी. प्रा.जगधाने एस.एम., प्रा. नागरगोजे व्ही. टी., प्रा.दळवी सतीश व प्रा.श्रीमती पाटील एस.एन, प्रा.साबळे एस.एन, प्रा. वाकळे ए.जी. प्रा.आर.एस.पठाण  हे उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालय व्यवस्थापक प्रा.हरी घाडगे, सुतार रामचंद्र, गुलाब मुजावर, गावठे दत्तात्रय व विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.


 
Top