उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 एसटी बंद असल्यामुळे शाळा सुरू असून शाळेत जाता येत नसल्यामुळे महाविद्यालयीन २२२ विद्यार्थ्यांनी एक नागरिक एक पत्र या अभियानात सहभाग घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बस चालू करून आमचे शैक्षणिक नुकसान टाळावे अशी मागणी केली आहे.

दिलेल्या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, शेतकरी व सामन्यांची ताकद देशाला कळली मग सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेची गरज व एस. टी. कर्मचाऱ्यांची व्यथा उद्धव ठाकरे साहेब, समजून घ्या भीम निर्णायक युवा समूहव मित्र परिवाराच्याच्या वतीने एक नागरिक एक पत्र मुख्यमंत्र्यांना एसटी संपावर तोडगा काढा हे या अभियानात २२२ विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन सहभाग नोंदविला आहे.

 
Top