उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाकरे सरकार आहे, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी सांगितले. शुक्रवार व शनिवार हे दोन्ही दिवस त्यांनी कळंब तालुक्यातील अतिवृष्टी भागाची पाहणी केली. शनिवारी बहुला, आढाळा,आथर्डी,सात्रा,खोंदला, भाटसांगवी ,भोगजी,अडसुळवाडी,देवळाली या भागातील शेतकऱ्यांना धीर दिला.जिल्ह्यातील सोयाबीन व इतर पिकांच्या नुकसानीच्या पिक विमा कंपनीस ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे आमदार पाटील यानी सांगितले.

मागील काही दिवसांपासून चालू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होत असल्याने नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आल्याचेही त्यानी म्हटले आहे.पीक विमा कंपनीच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याकरिता वैयक्तिक पंचनामे होणे आवश्यक आहे.यासाठी शेतकऱ्यांनी पिकांचा विमा भरला असल्यास बजाज एलियांज जी आईसी लिमिटेडचे नवीन “फार्ममित्र-केयरिंगली योर्स”अँड्रॉइड अॅप डाऊनलोड करून त्याद्वारे नुकसान झालेल्या पिकांची माहिती 72 तासांच्या आत कळविण्याचे अवाहनही आमदार पाटील यांनी केली. व्यतिरिक्त पिक विमा बाबतीत काही अडचण आल्यास संबंधित तलाठी, कृषी सहाय्यक, विमा कंपनीच्या तालुकास्तरावरील विमा प्रतिनिधी किंवा तालुका व्यवस्थापक (मॅनेजर) यांच्याशी संपर्क साधून नुकसानीच्या तक्रारी ऑफलाईन दाखल करून पोहोच घ्याव्यात. या प्रक्रियेत कोण हयगय करत असेल किंवा दुर्लक्ष करीत असल्यास त्याबाबत तातडीने आपल्याशी संपर्क साधा असेही,आवाहन आमदार घाडगे पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले आहे.


 
Top