तुळजापूर/ प्रतिनिधी-
तालुक्यातील पांगरदरवाडी येथे पाझर तलावातील पाण्यात बुडून एका 75 वर्षिय शेतकऱ्याचा मृत्यु झाल्याची दुदैवी घटना समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार दि.1 सप्टेंबर रोजी पांगररदरवाडी येथील भिमा मारुती साळुंके वय (75) हे आपल्या शेतात जनावरे चारण्यासाठी गेले होते. दुपारच्या सुमारास उन्हाची तीवृता वाढल्याने जनावरांना पाणी पाजुन त्यांना धूण्यासाठी ते शेतातील पाझर तलावात उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. मयत शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मयत शेतकरी भिमा साळुंके यांच्या पाश्च्यात पत्नी, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे.