उस्मानाबाद / प्रतिनिधी-
शेतकरी, शेतमजुर, सामान्य लोकांची मुले, घडविण्याचे काम जि.प.शाळेतुन शिक्षकवृंध्द करत असतात, त्यामुळे त्यंाचे करावे तेवढे कौतुक कमी आहे, असे प्रतिपादन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले.
उस्मानाबाद-उस्मानाबाद जिल्हा तेली समाज सेवाभावी संघटनेच्या वतीने गुणवंत शिक्षण सन्मान सोहळ्याची सुरूवात तेली समाजाचे आराध्य दैवत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार कैलास घाडगे पाटील,नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
यावेळी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर म्हणाले शिक्षक हा राष्ट्राचा मुलभुत पाया आहे.शिक्षक हा राष्ट्रनिमिर्तीत मुलभुत घटक आहे.यांचा गुणगौरव झालाच पाहिजे.त्यांच्या पाठिवर हि कौतुकाची थाप टाकली तर अजुन जोमाने कष्ट करून चांगले विद्यार्थी घडतील.असे सांगितले.
सर्व शिक्षक वृदांचे हार शाल व सन्मान पत्र देऊन 2021 व 2022 या दोन वर्षातील तेली समाजातील गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त उस्मानाबाद जिल्हयातील उस्मानाबाद,तुळजापुर,लोहारा,उमरगा,कळंब,वाशी,भुम,परंडा तालुक्यातील 46 शिक्षकवृंद यांचा सन्मान सोहळा पार पडला.कार्यक्रमाचे सुत्रसंचल सचिन राऊत यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक तेली समाजाचे आजवरचे कार्य व यापुढेही होणारे विविध कामासंदर्भात रवि कोरे यांनी माहिती दिली.
या कार्यक्रमास जि प सदस्य नितिन शेरखाने,समता परीषदेचे राज्य सरचिटणीस आबासाहेब खोत,तेली समाजाचे जिल्हाउपाध्यक्ष राजाभाऊ घोडके,सचिव अँड विशाल साखरे,कोषाध्यक्ष महादेव मेंगले,प्राचार्य अनिल देशमाने,दत्ता बेगमपुरे,शिवलिंग होनखांबे,चंद्रकांत मेंगले,कलशेट्टी अशोक चिंचकर,भिमाशंकर डोकडे,नागेश निर्मळे,सर्यकांत चौधरी,दिपक नाईक,संजोग पवार,दिपक पवार,जितेंद्र घोडके,कपिल नवगिरे आदिंची उपस्थिती होती.