उमरगा / प्रतिनिधी : -

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या श्री विठ्ठलसाई साखर कारखान्यातर्फे कर्मचाऱ्यांच्या कुंटूंबीयास १९ लाख ७ हजार रुपयाचे आर्थिक मदतीचा धनादेश जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा कारखान्याचे संचालक शरण पाटील यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्त करण्यात आले. त्यांचे पत्नीला दरमहा २६४६ रुपये फॅमिली पेन्शन व त्यांच्या दोन मुलांना प्रत्येकी दरमहा रुपये ६६२ प्रमाणे पेन्शन मंजूर करून घेण्यात आले आहे.

मुरुम येथील श्री विठ्ठलसाई कारखान्याचे कृषि सहाय्यक बाबाराव कदारे यांचे दि. १४ मे २०२१ रोजी कोरोनामुळे निधन झाले होते. कारखान्याने अशा कर्मचाऱ्यांच्या कुटूंबीयांबद्दल पूर्वी पासूनच सहानुभूतीचे धोरण ठेवून वेळोवेळी सढळ हाताने आर्थिक मदत केलेली आहे. याचाच भाग म्हणून कारखान्याचे चेअरमन बसवराज पाटील यांनी कदारे यांच्या कुंटूंबास आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते तथा कारखान्याचे संचालक शरण पाटील यांच्या हस्ते कदारे यांना कारखान्याकडून १९ लाख ७ हजार रुपयाचा धनादेश त्यांच्या पत्नी श्रीमती शिलादेवी बाबाराव कदारे यांना आज अचलेर येथे त्यांच्या घरी नेवून देण्यात आला. तसेच भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडून के. कदारे यांच्या पत्नीला दरमहा रु. २६४६ फॅमिली पेन्शन व त्यांच्या दोन मुलांना प्रत्येकी दरमहा रु. ६६२ प्रमाणे पेन्शन मंजूर करून घेण्यात आले आहे. या प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक दत्ता पाटील, सरपंच प्रकाश लोखंडे, माजी सरपंच सुभाष सोलंकर, परमेश्वर पटणे, शिवराज कमलापुरे, शिवपुत्र पाटील, सिध्दाराम पत्रिके, महादेव कदारे. आप्पासाहेब कदारे, अचितानंद कुंभार, कल्लाप्पा गोपने कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. बी. अथणी, चिफ अंकाउंटंट शत्रुघ्न देशमुख, केन अंकाउंटंट राजू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

 
Top