उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 टायगर ग्रुप उस्मानाबाद जिल्हा शाखेच्या तर्फे एक हात मदतीचा ही संकल्पना राबवली व सांगली येथील कृष्णा नदीत आलेल्या पुरा मुळे जी पुरष्टिती निर्माण झाली त्यात अनेक घर व तेथील लोक बेघर झाले जीवनावश्यक वस्तू पुरात वाहून गेल्या हीच बाब लक्षात घेता टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान. डॉ.तानाजी भाऊ जाधव यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष पैलवान तुषार भाऊ शिंदे व जिल्ह्यातील सदस्यांनी जमा केलेल्या जिवन अत्यावश्यक वस्तू सांगलीचे जिल्हाध्यक्ष पैलवान पिंटू भाऊ माने त्यांच्याकडे पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी संपूर्द करण्यात आले व त्यांचे योग्य पध्दतीने वाटप देखील सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहे.


 
Top