उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कृषी उत्पन्नात भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळावे.कृषी उत्पादनात नावीन्यपूर्ण पध्दती अवलंबून अधिक प्रमाणात उत्पन्न घेण्यासाठी प्रयोगशीलपणे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा उत्साह वाढवा,त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून खरीप पीक हंगाम 2021 साठी खरीप पीक स्पर्धा राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुकास्तरावर राबविण्यात येत आहे. संबंधित शेतकऱ्यांनी 31 ऑगस्ट 2021 पर्यंत रितसर अर्ज करावेत,असे आवाहन अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.

 राज्यामध्ये पीकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात त्यातून उत्पादकतेत वाढ होते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत त्यांना प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येतो.शेतकऱ्यांचे यातून मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळते. त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडते.हा उद्देश ठेवून राज्यात कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. या खरीप हंगामापासून पूर्वीच्या पीक स्पर्धेच्या निकषांमध्ये शिथिलता आणि सुयोग्य बदल करुन नव्याने स्पर्धा राबविण्यात येत आहे. 

 सध्याच्या पीकास्पर्धेतील महत्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत.

  पीकास्पर्धेसाठी पीकनिहाय तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येईल.खरीप हंगामासाठी स्पर्धेतील समाविष्ट पिकं :- भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी ), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल असे एकूण 11 पिकं आहेत.प्रती तालुका किमान स्पर्धक संख्या- सर्वसाधारण गटासाठी दहा व आदिवासी गटासाठी पाच.पीकास्पर्धामध्ये सहभागी लाभार्थीच्या शेतावर त्यापीकाखाली किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकांची पीक स्पर्धा संबंधित तालुका कृषी अधिकारी जाहीर करतील.

 तालुक्यात पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या- सर्वसाधारण गटासाठी पाच व   आदिवासी गटासाठी चार.स्पर्धेत भाग घेणा-या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. प्रवेश शुल्क-सर्व गटासाठी पीक निहाय प्रत्येकी रक्कम तीनशे रुपये. अर्ज दाखल करण्याची तारीख-मूग व  उडीद पीक-31 जुलै2021. भात,ज्वारी,बाजरी, मका, नाचणी (रागी ), तूर,सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल-31 ऑगस्ट-2021.पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन, 7/12, 8अ चा उतारा व जात प्रमाणपत्र

 (केवळ आदिवासी असल्यास) या कागदपत्रांची पूर्तता करून कृषी कार्यालयात द्यावे. पीक स्पर्धा विजेत्यांसाठी बक्षीचे  स्वरुप-सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षीस रुपये-

  स्पर्धा पातळी-तालुका पातळी-पहिले-पाच हजार रुपये. दुसरे-तीन हजार रुपये.तिसरे-दोन हजार रुपये.जिल्हा पातळी पहिले-10 हजार रुपये.दुसरे-सात हजार रुपये.तिसरे-पाच हजार रुपये. विभाग पातळी-पहिले-25हजार रुपये.दुसरे-20 हजार रुपये.तिसरे-15 हजार रुपये.राज्य पातळी पहिले-50 हजार रुपये.दुसरे-40 हजार रुपये.तिसरे-30 हजार रुपये.

  पीक स्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.तसेच अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक / कृषी पर्यवेक्षक / तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

  रब्बी हंगाम 2020 मध्ये पीकस्पर्धेसाठी राज्यातील शेतक-यांनी चांगला प्रतिसाद दिला. त्याप्रमाणे खरीप हंगाम 2021 साठी देखील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मूग व उडीद पिकांसाठी 31 जुलै पूर्वी तर इतर खरीप पिकांसाठी 31 ऑगस्ट पूर्वी अर्ज सादर करुन पीक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना केले आहे.


 
Top