लोहारा/प्रतिनिधी

गेल्या वर्षीचा पीक विमा तात्काळ वितरीत करण्यात यावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी तहसीलदार संतोष रूईकर व तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांना दिले आहे.

 शेतकऱ्यांना गतवर्षीचा पिक विमा अतिवृष्टी होऊन मोठे नुकसान झाले असतानाही विमा कंपनीच्या व राज्य सरकारच्या मनमानी व नियोजनशुन्य कारभारामुळे आजतागायत लोहारा तालुक्यातील हजारों शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत. पिक विमा न मिळाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे गतवर्षी चा पिक विमा तात्काळ शेतकऱ्यांना देण्यासाठी विना कंपनीने व शासनाने शेतकऱ्यांचे हित जोपसण्यासाठी तात्काळ पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना खात्यावर जमा करावी, अन्यथा लोहारा तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका उपाध्यक्ष प्रशांत माळवदकर, युवा मोर्चा माजी तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, राजेंद्र कदम, उपस्थित होते.


 
Top