उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानबाद कोव्हीड व पीक हंगाम बैठकीच्या दौर्या निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आले असता त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय येथे ओ बी सी राजकीय बचाव समिती व बहुजन योध्दा सामाजिक संघटना तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परीषद यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसींना मिळणारे 27 टक्के राजकीय आरक्षण या पुढील काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कायम ठेवावे व तसेच इतर मागास्वर्गीय व मागासवर्गीय अधिकारी/ कर्मचारी यांना पद्दोन्नती मध्ये आरक्षण लागु करण्यात यावे,ओबीसी जातनिहाय जनगनना करण्यात यावी.तसेच जो प्रर्यंत ओबीसी समाजाच्या मागण्या पुर्ण होत नाहीत तो पर्यंत राज्यामध्ये कोठेही निवडणुक घेण्यात येऊ नये.असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ओ बी सी समाजाच्या वतीने म्हणने मांडण्यात आले. अजित  वार यांनी ओबीसी समाजाला वेळ देऊन सर्व प्रश्न समजुन घेऊन सरकार दरबारी मांडण्याचे आश्वासन दिले. 

यावेळी ओबीसी आरक्षण समितीचे अध्यक्ष लक्ष्मण माने,बहुजन योध्दा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष धनंजय शिंगाडे,तेली समाज संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष रवि कोरे आळणीकर,पत्रकार तथा ओबीसी आरक्षण समितीचे प्रसिध्दी प्रमुख संतोष हंबीरे,समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष महादेव माळी,चर्मकार संघटनेचे युवक राज्यप्रदेश अध्यक्ष नितिन शेरखाने,लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवानंद कथले,अदिवाशी कोळी महासंघ जिल्हाध्यक्ष डी एन कोळी,गवळी समाजाचे नेते सुरेश गवळी आदिंची उपस्थिती होती.

 
Top