उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राज्यात दरवर्षी शेती व पुरक क्षेत्रात अति उल्लेखनिय कार्य करणा-या शेतक-यास अथवा संस्थेस महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत शेती क्षेत्राशी संबंधित विविध पुरस्कार राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते प्रदान करुन सन्मानित करण्यात येतात.

  पुरस्काराचे नाव - डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार- राज्यातून एक पुरस्कर देण्यात येतो. पुरस्कार रक्कम 75 हजार रुपये. वसंतराव नाईक कृषिभुषण पुरस्कार - आठ कृषि विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 8 पुरस्कार देण्यात येतात. पुरस्कार रक्कम 50 हजार रुपये. जिजामाता कृषिभुषण पुरस्कार- आठ कृषि विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 8 पुरस्कार देण्यात येतात. पुरस्कार रक्कम 50 हजार रुपये. कृषिभूषण (सेंद्रिय शेती ) पुरस्कार - आठ कृषि विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 8 पुरस्कार देण्यात येतात. पुरस्कार रक्कम 50 हजार रुपये. युवा शेतकरी पुरस्कार - आठ कृषि विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 8 पुरस्कार देण्यात येतात. पुरस्कार रक्कम 30 हजार रुपये. वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार आठ कृषि विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 8 पुरस्कार देण्यात येतात. पुरस्कार रक्कम 30 हजार रुपये. उद्यान पंडीत पुरस्कार - आठ कृषि विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 8 पुरस्कार देण्यात येतात. पुरस्कार रक्कम 25 हजार रुपये. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार - 40 (सर्वसाधारण गटासाठी प्रति जिल्हा 1 याप्रमाणे 34 आणि आदिवासी गटासाठी प्रति विभाग 1 याप्रमाणे 6 असे एकूण 40 पुरस्कार देण्यात येतात. पुरस्काराची रक्कम 11 रुपये इतकी आहे. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार- आठ कृषि विभागातून प्रत्येकी 1 अधिकारी/कर्मचारी याप्रमाणे 8 तसेच कृषि आयुक्तालय स्तरावरून एक अधिकारी/कर्मचारी याप्रमाणे एकूण 9 पुरस्कार देण्यात येतात. 

  महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत विविध कृषी पुरस्कार सन-2020 करीता प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. यावर्षी 15 फेब्रुवारी, 2021 च्या शासन निर्णयान्वये विविध कृषी पुरस्कारांच्या संख्येमध्ये वाढ करण्यात आली असून काही अंशी निकषामध्ये बदलही करण्यात आले आहेत. तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनिय व नाविन्यपुर्ण कामगिरी करणाऱ्या युवा शेतकऱ्यांसाठी राज्यातील प्रत्येक कृषी विभागातुन एक याप्रमाणे एकुण आठ युवक शेतकऱ्यांना युवा शेतकरी पुरस्कार ह्या वर्षापासून नव्याने देण्यात येणार आहे.

  सर्व शेतकरी बंधु भगिनी, शेतकरी गट/संस्था यांना कृषि विभागामार्फत आवाहन करण्यात येते की, मार्गदर्शक सुचनांचे अधिन राहुन कृषि पुरस्कारासाठीचा आपला परिपूर्ण प्रस्ताव कृषी विभागाच्या नजीकच्या कार्यालयात दिनांक 30 जुन, 2021 पर्यंत सादर करावा. विविध कृषि पुरस्कारांच्या मार्गदर्शक सुचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

     शेतकऱ्यांना अर्ज करताना कोणतीही अडचण आल्यास तात्काळ शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ संपर्क साधावा, हेल्पलाइन सकाळी १० ते रात्री ६ पर्यंत मोफत आहे अशी माहिती शिवार फाऊंडेशनचे प्रमुख विनायक हेगाणा यांनी दिली. यासाठी कृषी विभाग,जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, राष्ट्रीय सेवा योजना, मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शनासाठी एम.एच.आय , व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय उस्मानाबाद या शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी संस्था सर्वांचे सहकार्य मिळत आहे.

 
Top