उस्मानाबाद/ प्रतिनिधी

राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतक-यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात.उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतक-यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती,मनोबल यांमध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतक-यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतक-यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल,हा उद्देश ठेऊन कृषी विभागामार्फत राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविली जात आहे. 2020 च्या रब्बी हंगामासाठी सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी रब्बी ज्वारी, गहू,हरभरा,जवस,तीळ व करडई या सहा पिकांसाठी पीकस्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तथापि , जवस आणि तीळ या दोन पीकांसाठी स्पर्धक संख्या कमी असल्याने स्पर्धा झाल्या नाहीत. उर्वरित रब्बी ज्वारी, गहू, हरभरा व करडई या चार पिकांसाठी राज्यामधून एकूण 6053 स्पर्धक शेतक-यांनी सहभाग घेतला.       

 2020 च्या रब्बी हंगामाचा सर्वसाधारण व आदिवासी गटासाठीचा निकाल दि.24 जून 2021  रोजी राज्यस्तरीय पीकस्पर्धा समितीमार्फत निकाल घोषित करण्यात आला.

 रब्बी ज्वारी या पिकांतील सर्वसाधारण गटाच्या प्रवर्गामध्ये साहेबराव मन्याबा चिकणे मु.पो.सोनगांव,ता.जावली,जि.सातारा यांनी १०१ क्विं/हे उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक, सोमनाथ बाबुराव मुंडेकर, मु.पो.आरसोली, ता.भुम,जि.उस्मानाबाद यांनी ९४.३० क्विं/हे उत्पादन घेऊन द्वितीय क्रमांक तर नितीन बाजीराव वरखडे, मु.पो.वरखडवाडी, ता.वाई, जि.सातारा यांनी ९० क्विं/हे उत्पादन घेऊन तृतीय क्रमांक मिळविला आहे.

 तसेच रब्बी ज्वारी या पीकातील आदिवासी गटाच्या प्रवर्गामध्ये आटया देवजी पाडवी. पो.खेडले,ता.तळोदा,जि.नंदुरबार यांनी ५१.५० क्विं/हे उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक, नोवा आटया पाडवी, मु.पो.नर्मदानगर ता.तळोदा, जि.नंदुरबार यांनी ४३ क्विं/हे उत्पादन घेऊन द्वितीय क्रमांक तर बापू नागो पवार, मु.पो.कळंबू ता.शहादा, जि.नंदुरबार यांनी ३६.४० क्विं/हे उत्पादन घेऊन तृतीय क्रमांक मिळविला आहे.

 गहू या पीकातील सर्वसाधारण गटाच्या प्रवर्गामध्ये सुहास वसंतराव बर्वे,मु.पो.डुबेरे,ता.सिन्नर, जि.नाशिक यांनी ९०.७१ क्विं/हे उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक, आप्पासाहेब नामदेव आरोटे, मु.पो.महाजनपूर ता.सिन्नर, जि.नाशिक यांनी ९० क्विं/हे उत्पादन घेऊन द्वितीय क्रमांक तर शिवाजी बाजीराव सोमवंशी मु.पो.सुंदरपूर,ता.निफाड, जि.नाशिक यांनी ८२.९८ क्विं/हे उत्पादन घेऊन तृतीय क्रमांक मिळविला आहे. तसेच गहू या पिकातील आदिवासी गटाच्या प्रवर्गामध्ये विठ्ठल भिवा आवारी मु.पो.साकुर, ता.ईगतपुरी यांनी ६०.१० क्विं/हे उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक,सुधाकर बापूराव कुंभेरे मु.पो.लोणसावळी, ता.वर्धा,जि वर्धा यांनी ५४ क्विं/हे उत्पादन घेऊन द्वितीय क्रमांक तर महेंद्र दौलत नैताम,मु.पो.खैरगाव दे.ता.पांढरकवडा, जि.यवतमाळ यांनी ५३.६८ क्विं/हे उत्पादन घेऊन तृतीय क्रमांक मिळविला आहे.

 हरभरा या पिकातील सर्वसाधारण गटाच्या प्रवर्गामध्ये वसंत पांडुरंग कचरे मु.पो.काटेवाडी, ता.खटाव,जि.सातारा यांनी ६३.१० क्विं/हे उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक, सुरेश देवबा चेके मु.पो.पिंपरी (मे) ता.वर्धा, जि.वर्धा यांनी ५५ क्विं/हे उत्पादन घेऊन द्वितीय क्रमांक तर श्रीमती सुमन शिवाजी जगताप, मु.पो.सुरवड ता.इंदापूर, जि.पुणे यांनी ५४.३२ क्विं/हे उत्पादन घेऊन तृतीय क्रमांक मिळविला आहे. तसेच हरभरा या पिकातील आदिवासी गटाच्या प्रवर्गामध्ये हिराचंद मोतीराम गावीत,मु.पो.धनेर दि.,ता.कळवण,जि.नाशिक यांनी ४८.३० क्विं/हे उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक, कैलास राजाराम पवार मु.पो.ईनशी, ता.कळवण, जि.नाशिक यांनी ४२.२६ क्विं/हे उत्पादन घेऊन द्वितीय क्रमांक तर देवराव कोन्दुजी शेडमाके मु.पो.डोंगरगांव मक्ता,ता.गोडपिंपरी, जि.चंद्रपूर यांनी ४१.३१ क्विं/हे उत्पादन घेऊन तृतीय क्रमांक मिळविला आहे.

 करडई या पिकातील सर्वसाधारण गटाच्या प्रवर्गामध्ये राजेश हनमंतराव हाळदे मु.पो.आतूर, ता.देगलूर, जि.नांदेड यांनी ३४.७२ क्विं/हे उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक, सुनिल नामदेव चिमनपाडे मु.पो.कुडली ता.देगलूर, जि.नांदेड यांनी २७.७९ क्विं/हे उत्पादन घेऊन द्वितीय क्रमांक तर प्रतापरेडडी देवन्ना चिंतलवार मु.पो.आलूर, ता.देगलूर, जि.नांदेडयांनी २३.५६ क्विं/हे उत्पादन घेऊन तृतीय क्रमांक मिळविला आहे. करडई पिकामध्ये आदिवासी प्रवर्गातून स्पर्धक सहभागी झाले नाहीत.

 या सर्व पिकस्पर्धा विजेते शेतक-यांना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत प्रथम क्रमांकाला रक्कम 50 हजार रुपये द्वितीय क्रमांकाला रक्कम 40 हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाला रक्कम 30 हजार रुपये बक्षीस रक्कम मिळणार आहे. सर्व विजेत्या शेतक-यांचे कृषी विभागामार्फत खूप खूप अभिनंदन.

 
Top