तुळजापूर / प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ बचत गटाच्या माध्यमातून येथील उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथील कोरोना रुग्णांनाच्या 100 नातेवाईकांना दि.१९ बुधवार पासुन मोफत अन्नदान वाटप उपक्रम शुभारंभ करण्यात आला.
यावेळी उपजिल्हा रुग्नालयाच्या अधिक्षक डॉ. चंचला बोडके, डॉ. दिग्विजय कुतवळ, श्री स्वामी समर्थ बचत गटाचे विक्रम कदम,गुरुराज डोंगरे,तोफीक तांबोळी,नानासाहेब डोंगरे,इम्रान शेख, सौरभ कदम,गणेश पवार,शादाफ शेख, दत्ता लोखंडे,हैदर शेख, ,प्रितेश डाके सत्यजित डोंगरे आदीसह श्री स्वामी समर्थ बचत गटाचे पदाधिकारी उपस्थित होते तसेच हा मोफत अन्नदानाचा उपक्रम पुढील 15 दिवस सकाळी व संध्याकाळी दिवसातून 2 वेळेस होणार असल्याचे संयोजकांनी सांगितले आहे .