उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबादेत आजपासून 9 दिवस जनता कर्फ्यू लागू करण्यात आला असून यामधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. या अगोदर जनता कर्फ्यू दिवशी बॅक सेवा ग्राहकांसाठी बंद होत्या.यामुळे ग्राहकांच्या सुविधांवर मर्यादा आल्या होत्या.याबाबत व्यापारी तसेच बॅक ग्राहकांनी आपल्या अडचणी आमदार कैलास पाटील यांच्याकडे मांडल्यानंतर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांनी पूर्वीप्रमाणेच ग्राहकांसाठी बॅकेचे कामकाज सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत ठेवण्यात यावे असे आदेश दिले आहेत.

दुपारनंतर बॅकेचे फक्त अंतर्गत कामकाज सुरु राहणार आहे. या आदेशामुळे पेट्रोलपंप चालक,गॅस एजन्सीज,मेडिकल दुकानदारांसह अनेकांची गैरसोय दूर झाली आहे.

 
Top