उस्मानाबाद / प्रतिनिधी–  

जिल्ह्यात कोरोणाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून उपलब्ध बेड अपुरे पडू लागल्याने रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची हेळसांड होत आहे .पुढील धोक्याचा काळ लक्षात घेऊन उस्मानाबाद येथे 500 खाटाचे व कळंब उपजिल्हा रुग्णालय येथे दोनशे खाटाचे जम्बो कोविड रुग्णालय उभारण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला द्यावेत अशी मागणी शिवसेनेचे आमदार कैलास घाडगे-  पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे .

उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोणाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असून ॲक्टिव रुग्नसंख्येने साडेपाच हजारांचा पल्ला पार केला आहे .जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या बेडची संख्या अपुरी पडत असून ऑक्सीजन व इंजेक्शन देखील अपुरे पडत आहेत. यामुळे कोरोनाग्रस्त रुग्ण सोबतच त्याच्या नातेवाईकांची ससेहोलपट होत असून मृत्यूच्या प्रमाणात देखील वाढ होत आहे. आगामी काळात अशी संख्या वाढत राहिली तर पुढील धोका लक्षात घेऊन उस्मानाबाद शहरातील शासकीय रुग्णालय परिसरात पाचशे खाटाचे जम्बो कोविड सेंटर व कळंब येथील उपजिल्हा रुग्णालय  परिसरात 200 खाटाचे  कोविड सेंटर उभारण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला द्यावेत अशी मागणी उस्मानाबाद कळंब विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार कैलास घाडगे – पाटील यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे सत्ताधारी आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर मोठ्या प्रमाणात उस्मानाबाद जिल्ह्याला दिलासा मिळणार आहे.

 
Top